ग्रामसेवकांच्या रथाचे बनले सारथी सरपंच राजू मगदुम .....
माणगाव ( प्रतिनिधी ) :माणगाव गावच्या विकासात ग्रामसेवक बी . बी. राठोड यांचे योगदान लाख मोलाचे असून ग्रामपंचायतीस आजपर्यंत मिळालेल्या सर्व पुरस्काराचे वाटेकरी तेच आहेत असे गौरोवोद्वार विद्यमान सरपंच राजू मगदूम यांनी व्यक्त केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामसेवक बी. बी. राठोड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी जिनगोंडा पाटील हे होते. गावाला ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या माणगांवच्या ऐतिहासिक विकासाची सुरुवात ग्रामविकास अधिकारी बी बी.राठोड यांच्या कारकिर्दीमध्ये झाली गावाला राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा जिल्हा स्मार्ट ग्राम व्हिलेज पुरस्कार मिळवून ५१ लाखाचे बक्षीस मिळाले, अनेक तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवण्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली आहे ३५ वर्षाच्या एकूण सेवेतील १५ वर्ष माणगांवमध्ये सेवा करुन गावचे नाव लौकिक केले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात मोठया उत्साहात पार पडला. यावेळी हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी या प्रमुख पाहुण्या म्हणून ऊपस्थित होत्या. त्या बोलताना म्हणाल्या, राठोड यांच्या सारखे निष्कलंक अधिकारी सापडने हि काळाची गरज असून अशा अधिकाऱ्यांचा आदर्श घेऊन नव्या पिढीने कार्य करण्याची गरज आहे असे गौरवोदगार काढले. या वेळी ग्रामसेवक राठोड यांचा सरपंच राजू मगदूम यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राठोड यांची संपूर्ण गावातून रथातून बँड बाजाच्या गजरात व रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांच्यावतीने वतीने पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढत निरोप देण्यात आला, या वेळी ए. पी. मगदूम हायस्कुलच्या आर.एस. पी च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देत ग्रामसेवकांना निरोप दिला.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार सुजित मिणचेकर, उपसरपंच विद्या जोग, माजी सरपंच अनिल पाटील, अख्तर भालदार, प्रकाश पाटील, आय. वाय. मुल्ला, तंटा मुक्त अध्यक्ष सुनील मन्ने ग्रामसेवक यूनियनचे बाबासाहेब कापसे रुकडीचे अनिल बागडी, आप्पासाहेब कुंभार यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य . ए पी एम हायस्कुलचे विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.