मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा निर्णय =शंभूराज देसाई
28 जून 2024 रोजी राज्याचा अर्थसंकल्पातून या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, महिलांची ही परिस्थिती सुधारण्यासाठीच आम्ही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' लागू करत आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, तरुणवर्ग, अल्पसंख्यक समुदायासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली.या योजनेसाठी कोण पात्र आहे? या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षे वयोगटातील महिला पात्र असतील.
या योजनेची अंतिम मर्यादा 15 जुलै ही तारीख काढून टाकावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली, या प्रश्नाला उत्तर देत असताना शंभूराज देसाई म्हणाले की, ही योजना निवडणुकीपूर्ती आणली आणि नंतर बंद होईल असा गैरसमज नसावा . या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नसून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे हे
१५ जुलै अंतिम तारीख असणार आहे का?
तर या योजनेचे अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अंतिम तारीख नाही, ही योजना कायमस्वरूपी असणार आहे आणि या योजनेसाठी आपण कधीही अर्ज करू शकता त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज पसरवू नका असे आव्हान शंभूराज देसाई यांनी केली आहे
पृथ्वारीज चव्हाण काय म्हणाले?
आमदार चव्हाण म्हणाले पृथ्वारीज चव्हाण , लाडकी बहिण योजनेच्या 15 जुलै अंतिम नोंदणीच्या तारखेमुळे राज्यात नोंदणी केंद्राबाहेर मोठी गर्दी होत आहे. राज्यात काही भागात उन्हाची तीव्रता अजून असल्याने काही महिलांना भोवळ आल्याची घटना घडल्या आहेत. काही भागात पावसातही रांगा लागल्या आहेत, याकडेही चव्हाण यांनी सरकाचे लक्ष वेधले.
शंभूराज देसाई यांनी काय स्पष्टीकरण दिले?
पृथ्वाराज चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारतर्फे स्पष्टीकरण दिले आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, ही योजना निवडणुकीपूर्ती आणली आणि नंतर बंद होईल असा गैरसमज नसावा . या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नसून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे १५ जुलै अंतिम तारीख असणार आहे का? हा चुकीचा प्रचार केला जात आहे. तसं काहीही नाही. ही योजना शासनाने सभागृहात जाहीर केलेली आहे. या योजनेला काहीही कालमर्यादा नाही. ही योजना फक्त सहा किंवा एका वर्षासाठी असं कोठेही सांगितलेलं नाही. ही योजना कायम चालू राहणार आहे. म्हणून या योजनेबाबत गैरसमज पसरवू नये," असे स्पष्ट केले.